” हर घर तिरंगा” अभियान यशस्वी करण्यासाठी आळंदीकरांनी पुढाकार घ्यावा: मुख्याधिकारी कैलास केंद्रे

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(अरिफभाई शेख) भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रमातील अज्ञात नायक/क्रांतिकारक/स्वातंत्र्य संग्रमात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानाप्रमाणे आळंदी नगरपरिषदेकडून “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत असून यात सर्व आळंदी करांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रत्येकाने आपल्या घरावर १३ ऑगस्ट रोजी सकाळी झेंडा फडकवायचा असून तो १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता खाली उतरवून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy