भीमा-कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा,”प्रकाश आंबेडकर, आंबेडकरांच्या मागणीवर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(विशेष प्रतिनिधी) २०१८ साली पुण्याजवळील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे दंगल झाली होती. याप्रकरणी भीमा-कोरेगाव आयोगासमोर चौकशी सुरू आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणी केली आहे.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले होते. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे.प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत. प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे, आयोगासमोर कोणाला बोलवावं आणि कोणास बोलवू नये. पण, राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करत असतात. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे .

प्रकाश आंबेडकरांची मागणी काय?“

आयोगाने मला बोलण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसासाठी बोलवावे. तसेच, २०१८ साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy