जात धर्म पंथ विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share This News

बातमी24तास

प्रतिनिधी आरिफ भाई शेख

आळंदी/ जात धर्म पंथ विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मशतकोत्तर पारायण सोहळा आयोजन सभा मंडपातील कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला शांती ब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर, आमदार बाबाजी काळे आमदार शंकर जगताप आमदार उमा खापरे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह. पी ए आर डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मस्के ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजन नाथजी विश्वस्त चैतन्य महाराज कबीर विश्वस्त एडवोकेट राजेंद्र उमाप विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे विश्वस्त एडवोकेट रोहिणी पवार विश्वस्त पुरुषोत्तम पाटील. बबनराव कुऱ्हाडे , डी. डी.भोसले शंकरराव कुऱ्हाडे. संजय घुंडरे आळंदीकर ग्रामस्थ वारकरी भाविक आदी उपस्थित होते.

जगाला हेवा वाटेल असे जागतिक ज्ञानपीठ आळंदी येथील साडेचारशे एकर जागेमध्ये उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. जातपंथ धर्मविरहित समाज निर्माण करण्याचे संतांनी कार्य केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो वारकरी संप्रदाय निर्जवलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराज यांनी त्यावर कळस कळविला संतांची मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. असे म्हणत. डोळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळाल्याची ही भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तसेच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदाय आणि संतांनी केले त्यामुळे आपला विचार संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही परकीय आक्रमणाच्या वेळी संत समाजाला सुविचार विरोध होते त्यामुळे चांगल्या विचाराची परंपरा आजही सुरू आहे. प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला ह्यावा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तसेच ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.योगी निरंजननाथ जी यांनी प्रास्ताविकामध्ये तोळ्याची माहिती दिली. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने गौरव पत्र देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वर महाराज चिंतनात्मक असणाऱ्या नमुन्यानेश्वरा या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हत्या प्रकाशन करण्यात आलेले आहे तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावर नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबीयांचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy