
बातमी 24तास
प्रतिनिधी आरिफ भाई शेख आळंदी/श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मशत्कोत्तर उत्सवानिमित्त आळंदी मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र शासनातील मान्यवर मंत्री महोदयांनी आळंदीला हजेरी लावली होती.
दिनांक 3 मे ते 10 मे पर्यंत असणाऱ्या सोहळ्यामध्ये आज होणाऱ्या सांगता समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती दरम्यान त्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने निमंत्रित केलेल्या मुख्यमंत्री महोदयांनी माऊलींच्या मंदिरात दर्शन घेतले. तसेच विधिवत पूजाअर्चा करत श्री न्यानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
मुख्यमंत्री फडणवीस आळंदीत येणार असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा पार पडल्यानंतर विविध किर्तन प्रवचने भारुडे अशा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आज काल्याचे किर्तन होऊन या सप्ताह सोहळ्याचे समाप्ती होणार होती. त्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथजी विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप. विश्वस्त भावार्थ देखणे. विश्वस्त ह भ प निलेश महाराज लोंढे कबीर बुवा. विश्वस्त ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील. विश्वस्त ॲड. रोहिणी पवार. यांच्या समवेत मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आली होत. सकाळच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी त माऊलींचे दर्शन घेत या पारायण सोहळ्याला हजेरी लावली. दरम्यानच्या काळामध्ये शासनाच्या विविध मंत्री राज्यमंत्री यांनी या सोहळ्यात हजेरी लावली.